Saturday, March 7, 2015

आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि "आपण" कोण
आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि "आपले"
कोण आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"आयुष्य छान आहे"..."थोडे लहान आहे "...परंतु
लढण्यात शान आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथ
शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त
आहेत ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच
जास्त आडवी येतात !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले
आईवडील त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम
झाल्यावर प्रेम नाही बदलत
आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र
बदलतात वेळ आल्यावर..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"चांगली वस्तु"., " चांगली माणसे"., "चांगले
दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण
अश्रू ला बाहेर
येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईल ने जर
आपला फोटोग्राफ छान येत असेल,तर
"नेहमी स्माईल दिल्यावर आपले आयुष्य
किती सुंदर दिसेल "
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जिच्या उदरात जन्म
होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त
होतो ती माती यातील वेलांटीचा फरक
म्हणजे माणसाचे जीवन.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत
नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं
सोनं होतं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन
तुमची श्रीमंती कळते.
~~~~~~~~~~~~~~~~


No comments:

Post a Comment